शाळेची सहल वर निबंध | School Trip Essay in Marathi | School Trip Nibandh

School Trip Essay in Marathi | School Trip Nibandh

दरवषीर्प्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती. सहल जाण्याच्याविषयी एक आठवडा अगोदर गुरुजींनी आम्हा सर्व मुलांना सहलीविषयी सांगितले. सहलीचे ठिकाण होते किल्ले रायगड. आपल्या शाळेची सहल जाणार हे ऐकून आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झला. माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सहलीचा विषय काढल्याच्या दुसऱ्या दिवसापासून वर्गात सहीविषयीची चर्चा सुरू झाली. कोणताही मुलगा किंवा मुली शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नव्हता. प्रत्येकाची आपापसात सहलीविषयीची चुळबूळ चालू होती. ‘आपण तेथे गेल्यावर खूप मज्जा करायची”, ‘पकडापकडी खेळायचे’, ‘बॅट- बॉल खेळायचे” हीच वाक्ये प्रत्येक मुलाच्या तोंडून येत होती. मी ही ठरवली होतं की तिथे गेल्यावर जीवाचं रान करायचं.

बघता बघता दिवसामागून दिवस गेले. सहल जाण्याची तारीख होती. ११ फेब्रुवारी. अखेर सहलीचा दिवस उजाडला. शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे सर्व मुलं शाळेचा गणवेश घालून ठीक सकाळी ५.४५ वाजता शाळेत जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेच्या आवारात तीन मोठ्या लक्झरी बसेस उभ्या राहिल्या. शाळेच्या आवारात प्रथमच पालकांची गदीर् झाली होती. प्रत्येक पालक आपल्या बिन ओळखीच्या पालकांशी सहलीविषयी विचारपूस करत होता.

सर्व शिक्षकांनी आम्हाला शिस्तीचं पालन करण्यास सांगितलं. तसेच आपल्या शाळेचं नाव खराब होईल, अशी कोणतीही गैरवर्तणूक न करण्यास बजावलं. हजेरी घेण्यात आली. सहल असल्यामुळे कोणताही मुलगा किंवा मुलगी गैरहजर नव्हती. ठीक ६.३० वाजता बस रायगडकडे जाण्यास निघाली. गाडी सुरू होताच सर्व मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया” असा आवाज दिला आणि अखेर आम्ही रायगडकडे जाण्यास निघालो. बसमध्ये प्राण्यांच्या भेंड्या, नाचणे, एकमेकांना चिडवणे या सर्व गोष्टी चालू होत्या.

पाच-सहा तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. समोर साक्षात रायगड किल्ला उभा होता. किल्ला पाहून मी थोडा घाबरलोच. पण मनात पक्का विचार केला होता की न डगमगता हा किल्ला चढायचा. रायगडावर चढताना आम्ही सर्व मुलांनी हर हर महादेव”, ”शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा केल्या. रायगडावर चढणारी मुले ही जणू शिवाजी महाराजांचे मावळेच वाटत होते. दोन तासांनी आम्ही रायगडाच्या महाद्वारापाशी पोहोचलो. महाद्वारापासीच थोडं दुपारचं जेवण करून आम्ही रायगडावरील शिवकालीन वास्तू पाहण्यास निघालो.

रायगडाची समुदसपाटीपासूनची उंची २८५१ फूट तर रागडवाडीपासून १२५०फूट आहे. रायगड हा किल्ला हा उंच व मजबूत असल्याने शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यास राजधानी म्हणून घोषित केले होते. रायगडावरील मुख्य दरवाजा म्हणजे महाद्वार. या दरवाजाशिवाय गडावर जाण्यास दुसरी वाट नाही. महाद्वाराचे भव्यपण व मजबूती पाहून मन विस्मयाने केवळ दाटून आले. त्यानंतर आम्ही गंगासागर हे तलाव पाहण्यास गेलो. गंगासागरात शिवछत्रपींच्या राज्याभिषेकासाठी आणलेल्या सप्तसागर आणि महानद्यांचे तीर्थ अभिषेकानंतर यात टाळण्यात आली होती. म्हणून या तलावाचा ‘गंगासागर’ हे नाव पडले. त्यानंतर आम्ही नगारखाना पाहण्यास निघालो. नगारखान्याच्या आतील बाजूस मेघडंबरी दिसत होते. मेघडंबरी म्हणजे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा. आम्ही सर्व मुले मेघडंबरी जवळ उभे होतो. तेव्हा सरांनी आम्हाला काहीतरी आश्चर्य दाखवणार असल्याचे सांगितले. आमचे सर नगारखान्यापाशी गेले. नगारखान्यापाशी दोन सर आपापसात हळू आवाजात बोलत होते. ते बोलणेही आम्हाला स्पष्ट ऐकू येत होते. मेघडंबरी पासून नगारखाना २०० मीटर लांब असूनही त्यांचे बोलणे आम्हाला स्पष्ट ऐकू येणे हे जणू आश्चर्यच!

सर्व ठिकाणे पाहून झाल्यानंतर अखेर आम्ही सर्व मुले व शिक्षक शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी पोहोचलो. समाधीपाशी पोहोचताच सर्व मुले शांत झाली. शिवाजी महाराजांची ती समाधी पाहून आम्हा सर्व मुलांच्या डोळ्यात पाणी आले. शिवाजी महाराजांची समधी दिसायला किती भव्य आणि रम्य! तेथे हिंदू धर्म रक्षिणारा एक नरसिंह अखेरची चिरनिदा घेत होता. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या डावीकडे वाघ्या कुत्र्याची समाधी होती. वाघ्या कुत्रा म्हणजे शिवाजी महाराजांचा जीवाभावाचा कुत्रा होता. याच वाघ्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी मारली होती. शेवटी आम्ही सर्वजण समाधीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

गडावरून खाली उतरल्यावर आम्ही बसमध्ये चढलो. बस सुरू झाली व आम्ही मुंबईकडे जाण्यास निघालो. बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या रंगात आल्या होत्या. गाणी म्हणता म्हणता आम्ही मुंबईला पोहचलो. आम्ही सर्व आपल्या पालकांसोबत घरी गेलो. घरी आल्यावर माझं मन घरात राहतच नव्हतं. सारखा रायगड किल्लाच दिसत होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी शाळेत गेलो. वर्गात प्रवेश करताच पाहतो तर काय वर्गात अभ्यासाऐवजी सहलीच्याच गोष्टी रंगात आल्या होत्या. त्या गप्पागोष्टीतीत मीही सहभागी झालो. मला जेव्हा रायगडाची आठवण येते, तेव्हा रायगडावर जाण्याचं मन होतं.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा शाळेची सहल वर निबंध (School Trip Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा School Trip Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा शाळेची सहल वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment